समृद्धी बरोबरच आयुष्यात सुख येते हे खरे आहे का?
आयुष्यात जेव्हा मुबलक पैसा उपलब्ध होऊ लागतो, तेव्हा कसल्याही बर्या वाईट प्रसंगाना माणुस आत्मविश्वासाने सामोरा जातो, साहजिकच तो स्वतःवर प्रेम करु लागतो आणि दिवसातला बहुतांश वेळ आनंदी असतो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आयुष्यात जेव्हा मुबलक पैसा उपलब्ध होऊ लागतो, तेव्हा कसल्याही बर्या वाईट प्रसंगाना माणुस आत्मविश्वासाने सामोरा जातो, साहजिकच तो स्वतःवर प्रेम करु लागतो आणि दिवसातला बहुतांश वेळ आनंदी असतो.
राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलुन टाकतात. गांधीजींना जेव्हा रेल्वेतुन बाहेर फेकुन दिलं तेव्हा त्यांना प्रचंड राग आला, इतका की त्यांनी ना ना खटपटी करुन इंग्रजांनाच देशाबाहेर हाकलुन लावलं!
तो एका उच्चमध्यम वर्गीय सुखी घरात जन्मला होता. पण वयाच्या चौदाव्या वर्षी दहावीला असताना, काही कारणाने, त्याच्या वडीलांचा बिजनेस आर्थिक अडचणीत आला. एकामागोमाग एक संकटे कोवळ्या वयात त्याच्या कुटूंबावर कोसळली. तो हातपाय गाळुन रडत बसला नाही, त्याने कॉलेज शिकता शिकता अनेक धडपडी करायला सुरुवात केली.
टेंशन घेऊन, चेहरा पाडून, उदास जगण्यासाठी, आलेला दिवस ढकलण्यासाठी नाही, खळखळुन हसण्यासाठी आणि हसवण्यासाठी, हलकंफुलकं होवुन बागडण्यासाठी, थुईथुई कारंजं बनुन खळखळ होण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे, स्वतःचं खरं स्वरुप ओळखा, कंदीलावरची काजळी साफ करा, आतला दिवा स्पष्ट दिसु लागेल.
१२५ वर्षांपूर्वी एका पारशी बँकरनं कामाच्या ठिकाणी घरी बनलेल्या जेवणाचा डब्बा पाहिजे म्हणून पहिल्या डब्बेवाल्याला हि संधी म्हणा किंवा जबाबदारी दिली… याच संधीचं सोनं करून आज हे डब्बेवाले २००००० मुंबईकरांची भूक रोज भागवत आहेत.
मित्रांनो, कल्पना करा, एका माणसाने एका कुंडीत एक बी पेरलं, आणि रोज सकाळी उठुन तो माणुस त्या कुंडीकडे आणि त्या बी कडे रोज पाहतो, आणि त्याला सुचना देतो, ‘अरे झाडा, उगव’, ‘सुंदर सुंदर रंगबेरंगी फुलं येवु दे’, लवकरात लवकर चवदार फळं दे’, ‘ चल, फास्ट वाढ आणि मला थंडगार सावलीपण दे’, मित्रांनो, दिवसभर काय, महीनाभर बोलल्याने, किंवा वर्षभर असं घोकल्याने झाड लवकर येईल का हो?
अमेरिकेतल्या ‘फर्स्ट फेडरल सेव्हिंग्स अँड लोन असोसिएशन’ ह्या सर्वात जुन्या आर्थिक संस्थेने पुर्वी एक जाहिरात केली. त्यात लोकांनी बचत कशी आणि का केली पाहिजे ह्याबद्दल दैनंदिन आयुष्यातल्या सवयी आणि जीवनशैलींमधले बदल सांगितले.
तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही सुप्त मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. सुप्त मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!
आपल्या मनाचे दोन भाग आहेत, जागृत मन आणि सुप्त मन. जागृत मन रेल्वेच्या इंजिनासारखं आहे, मागे जोडलेले धुड म्हणजे सुप्त मन. जागृत मनाकडे उत्तम निर्णय क्षमता आहे, पण ते विसरभोळं आहे. सुप्त मनाला स्वतःची विचारशक्ती, विवेकबुद्धी नाही, पण ते अफाट शक्तीशाली आहे. त्याच्यावर कोरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची अफलातुन शक्ती त्याला प्राप्त आहे.
असे वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त झालेले लोक जेव्हा प्रश्न विचारतात, की तुमची भव्य दिव्य स्वप्नं ठिक आहे हो, आधी आमच्या समस्यामधुन आम्हाला मुक्त करा, मग लॉ ऑफ अट्रेक्शनचे प्रवचन द्या…….. मित्रांनो, काही जणांचे प्रश्न, काही वेळा, खरोखर मला निरुत्तर करुन जातात, मला माहितीये, दुसर्यांना उपदेश देणे तितकेच सोपे असते, जितके प्रत्यक्ष परिस्थीती हाताळणे, आव्हानांना सामोरे जाणे अवघड असते.