कल्पनांना कवेत घेणारी कल्पना चावला
१ फेब्रुवारी २००३ हा तो काळा दिवस ज्यादिवशी आपल्या कल्पनांना कवेत घेणारी भारताची सुपुत्री कल्पना अनंताच्या प्रवासाला निघून गेली. पण जाताना तिने अनेक मनांना स्वप्न दाखवली आणि त्यांना ती कवेत घेण्यासाठी उद्युक्त केल. म्हणून आजही कल्पना चावला हे नाव अजरामर आहे.