आता आश्वासनांच्या घोडदौडीत जुमलेबाज राजकारण्यांपासून सावध राहायला हवं!
भारतीय जनता पार्टीने भारतीय राजकारणात ‘जुमला’ या नव्या शब्दाची यानिमित्ताने भर घातली आहे. या पायंड्यानंतर आता तर कुठलीही भीडभाड न ठेवता राजकीय पक्षाचे नेते जनतेला भूलथापा देताना दिसत आहेत. कारण निवडणुका झाल्यांतनर तो एक जुमला होता असे म्हणायलाही ते आता मोकळे आहेत.