मनाची एकाग्रता वाढवून मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी करा हे उपाय

मन / मेदूं स्थिर रहात नाही… ‘अशी’ वाढवा तुमची एकाग्रता

कधी कधी आपल्या आत सतत निराशाजनक भावनांचा उद्रेक झालेला आपल्याला जाणवतो.

एका वाईट विचारा बरोबर वारुळातील असंख्य मुंग्या एका मागोमाग निघाव्यात, तसे वाईट विचार एका मागोमाग एक मनामध्ये उमटत जातात, आणि मन नैराश्य, आणि असहायतेने भरून येते.

दिवसा मागून दिवस जावेत पण हाती काही ही लागू नये, ज्या गोष्टींच्या मागे जीव तोडून पळत आहोत त्याच गोष्टी हातातून वाळू सारख्या निसटून जात आहेत असे तुम्हाला वाटत राहते का?

स्वतःला ‘हा’ प्रश्न विचारत असताना उत्तर, जर होय असे असेल तर तुम्ही मानसिक दृष्ट्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कमी पडत आहात, तुमची क्षमता असूनही तुम्ही, या कारणामुळे प्रगति पथपासून दूर आहात, असे समजायला काही हरकत नाही.

हावर्ड गार्डनर यांच्या सिद्धांतानुसार नुसार, आपण सुमारे 47% आपले मन इकडे तिकडे भटकवण्यात घालवतो. तुमचे लक्ष केंद्रित करण्यास शिकणे म्हणजे तुम्ही तुमची 100% क्षमता वापरण्यात सक्षम असाल असे नाही, परंतु ‘लक्ष केन्द्रित कसे करावे, फोकस कसे करावे’ हे शिकल्याने तुम्हाला तुमची योग्य दिशा कळण्यात मदत होईल योग्य दिशेने मार्गक्रमण करत, ध्येय प्राप्त कसे प्राप्त करावे याबाबतीत स्वतः स्वत:ला मार्गदर्शन करू शकाल, आत्मविश्वासाने पुढचे टप्पे गाठू शकाल…

स्वत: ला प्रशिक्षित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकत असताना, नेमके करायचे काय असा प्रश्न बहुतांशी लोकांना पडतो,

चला तर लक्ष केंद्रित करण्याचे सोपे मार्ग जाणून घेऊया.

1. आपल्याला नेमके कोणते ध्येय साध्य करायचे आहे हे ठरवा.

जर तुम्ही एखाद्या रस्त्यावर चालत आहात, परंतु कुठे जायचे आहे, या बद्दल तुमची सुनिश्चितता नाही… तेव्हा त्या चालण्याला काही अर्थ असेल का?

तेव्हा जीवनाचे उद्देश ठरवा. तुमचे मन मेंदू आणि शरीर यांचा तुम्ही ठरवलेल्या उद्देशाशी परस्पर संबंध नसेल तर फोकस करणे कठीण जाईल, डोळ्यासमोर ध्येय असेल तर कठीणातील कठीण परिस्थिती मधे सुद्धा माणूस पाय रोवून उभा राहू शकतो, कारण त्याची ध्येय गाठण्याची इच्छा प्रबळ असते. म्हणून आयुष्यात ध्येय असणे प्रचंड महत्वाचे आहे.

नवीन मार्ग, नवीन रस्ते शोधत असताना उडणारी तारांबळ, ध्येयप्राप्ती च्या दिशेने जाताना मार्गात आलेल्या खाचा खोचा, या आपल्या आयुष्याला वळण देण्यासाठी पायरी होण्याचे काम करत असतात.

जर तुम्हाला तुमचा मार्ग सापडत नसेल, तर आपल्याला आवडत असलेल्या गोष्टींवर वेळ घालवण्यास दीर्घ कालावधीसाठी अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. नव नवीन गोष्टीचा वापर करून स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यात वेळ घालवा

कोणते ही काम करत असताना त्यावर लक्ष केंद्रित असणे अतिशय महत्वाचे आहे. तुमच्या हातात असलेल्या अनेक कामां पैकी सगळ्यात महत्वाचे आधी आणि त्यानंतर दुसरे असा क्रम लावत गेल्यास हातात असलेली ‘to do list’ वेळेत पूर्ण होईल व त्याचा ताण ही जाणवणार नाही.
हेतु, मूल्य, आणि खर्च या गोष्टींमध्ये काम वाटून टाकल्यानंतर तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन करणे अवघड जाणार नाही.

2 . लक्ष विचलित करणार्‍या गोष्टी टाळा

घरी ऑफिस मध्ये किंवा अजून इतरत्र कामावर लक्ष केंद्रित करत असताना तुमचे लक्ष विचलित करणार्‍या गोष्टी शोधा, जेणे करून तुम्हाला त्यांना बाजूला ठेऊन तुमचे काम लवकर पूर्ण करता येईल.

3. मल्टीटास्क करण्याचा प्रयत्न करणे थांबवा

अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या एका संशोधनात असे म्हंटले आहे की मल्टीटास्किंग (विशेषतः क्लिष्ट कार्ये) हे उत्पादकतेला बाधा आणतात.

प्रत्येक वेळी तुम्ही मल्टीटास्किंग सुरू करता तेव्हा, उत्पादकता कमी होऊन मेंदूचे नुकसान, IQ मध्ये घट, तणाव आणि चिंता, शिकण्याची क्षमता कमी होणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे असे विकार आपल्याला जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीर्घकाळ मल्टिटास्किंग करणाऱ्या लोकांना कालांतराने ‘मल्टिटास्किंग डिसऑर्डर’ होण्याची सुध्दा शक्यता असते.

मल्टिटास्किंग करणे का आणि कसे टाळावे हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

4. तुमच्या उशीर करण्याच्या सवयीला बदलण्याचा प्रयत्न करा.

मल्टी टास्किंग करणे व कामा मधले लक्ष विचलित होणे ह्या सवयी तुम्ही प्रयत्नपूर्वक टाळू शकता, परंतु जर प्रत्येक कामामध्ये ऊशीर करण्याची तुमची सवय तुमच्या वरती हावी असेल तर मात्र तुमचे नुकसान ठरलेले आहे.

अंथरुणातून उठण्यासाठी जर आपल्याला संघर्ष करावा लागत असेल तर ही सवय बदला.

5. थोडी कॉफी प्या (लहान डोसमध्ये)

कॉफी मध्ये असलेले कॅफीन, तुमचा मेंदू फ्रेश करण्याचे काम करत असतो त्यामुळे जेव्हा तुम्हाला आळसावल्यासारखे वाटेल किंवा तुमचे लक्ष विचलित होत असल्यासारखे वाटेल तेव्हा थोड्या प्रमाणात कॉफी घेणे केव्हा ही चांगले.

6. तुमचे लक्ष नैसर्गिकरित्या वाढवा

जीवनसत्त्वे, पूरक आणि योग्य आहारासह तुम्ही तुमची ऊर्जा नैसर्गिकरित्या वाढवू शकता, जे तुम्हाला दिवसभर लक्ष केंद्रित करण्यात मदत करतील.

तुम्हाला हे देखील आढळेल की काही पदार्थ स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आहार कसा असावा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

जागेवरच बसून केलेले व्यायाम देखील आपल्याला ऊर्जा मिळवून देऊ शकतात ज्याने तुमच्या कामावरती तुम्हाला फोकस करता येईल.

7. ध्यान करा (आणि माइंडफुलनेसचा सराव करा)

ध्यान ही तुमचे मन, शरीर आणि आत्मा यांना केंद्रित करण्याची कला आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे केंद्रित असता, तेव्हा तुम्ही मनाला रिकामे ठेवता जे लेझरसारखे फोकस सक्षम करते.

अगदी 5 मिनिटांच्या माइंडफुलनेस मेडिटेशनचा तुमच्या वर्कफ्लोवर आणि ध्येयाच्या कालावधीवर चांगला परिणाम होताना दिसून येतो.

8. ऊर्जा समृद्ध अन्न खा

तुमचे लक्ष वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या शरीराला आवश्यक असलेले इंधन पुरवणे.

तुम्ही पुरेसे पाणी पीत आहात, योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट खात आहात, पुरेशी प्रथिने घेत आहात आणि ट्रान्स फॅट्स युक्त आहार टाळत आहात याची खात्री करा.

तुमचे शरीर आणि मन हे एकच घटक आहेत, ते दोघेही एकमेकांना पूरक आहेत.

वेळ असेल तेव्हा, निरोगी स्नॅक्स तयार करून व्यस्त वेळेचे योजना करा. जेव्हा तुम्ही व्यस्त दिवसात दुपारच्या जेवणासाठी जाऊ शकत नाही तेव्हा मूठभर काजू ही तफावत दूर करणारे असू शकतात.

9. दैनंदिन दिनचर्या तयार करा

दररोज संपूर्ण दिवसाचे प्लॅनिंग केल्याने तुम्हाला विशिष्ट कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वेळ मिळतो. जेव्हा तुमचे प्लॅनिंग तयार नसते तेव्हा मात्र तुम्हाला कामांसाठी व विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

दिनचर्या असणे हा चांगल्या सवयींनी भरलेली जीवनशैली तयार करण्याचा एक भाग आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत विशिष्ट वेळी काम करण्याची सवय असते, तेव्हा तुम्हाला हातातील कामावर लक्ष केंद्रित करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या मेंदूला तुमच्या दिनचर्येची सवय होईल.

10. लहान ब्रेक घ्या

तुमची क्षमता कमी होणे हे वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते, पण विश्रांती घेणे हा तुमचे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, सुधारण्याचा एक मार्ग आहे.

कामांवरती लक्ष केंद्रित करण्याच्या नादात आपला मेंदू थकून जातो, तेव्हा छोट्या छोट्या ब्रेक ची गरज असते. ते घेतल्याने आपण ताजे तवाने होतो व पुन्हा उत्साहाने कामावरती फोकस करू शकतो.

11. पुरेशी झोप घ्या

जेव्हा तुम्हाला लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असते, तेव्हा चांगल्या झोपेच्या सवयी महत्त्वाच्या असतात. तुम्हाला नेहमी थकल्यासारखे वाटत असल्यास, अधिक झोप घेणे हा तुमचे लक्ष केंद्रित करण्याचा सोपा मार्ग आहे.

वर दिलेले उपाय हे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे, यासाठी अत्यंत साधे सोपे आणि कधीही करून पाहता येण्यासारखे आहेत. तुम्ही ही करून पहा आणि स्वस्थ रहा.

अपूरी झोप घेण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय