सुंदर ते ध्यान!
ध्यान करणं, खरचं आवश्यक आहे का? असे कित्येक प्रश्न मला पडायचे, आणि अशातच पुण्याच्या वि. वि. गोखले यांचं, ‘ध्यानविद्या’ हे पुस्तक लायब्ररीतुन कुतुहलातुन आणलं, आणि ते वाचुन, त्याचा अभ्यास करुन, खरचं माझं आयुष्यच बदलुन गेलं, १९८० मध्ये लिहलेलं, हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने ‘ध्यान-उपासना’ केल्या जाणार्या पद्धतींच वर्णन आहे.