भारताच्या ताफ्यात नव्याने सामील झालेली शक्तिशाली पाणबुडी आय.एन.एस. अरिहंत
कारगिल विजय दिवसाच्या दिवशी २६ जुलै २००९ ला तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग ह्यांनी आय.एन.एस. अरिहंत ला हिरवा झेंडा दाखवला होता. आता सगळ्या चाचण्यांमधून पास होऊन, देशाच्या सागरी किनारे आणि आजूबाजूचा समुद्र ह्यांच्या संरक्षणाची धुरा पेलण्यास ती समर्थ झाली आहे. ही पाणबुडी पाण्याखालून शत्रूच्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला करून त्यांच्या नजरेपासून लपून राहू शकते.