स्वयंस्फूर्ती आणि स्वयंप्रेरणेचे १३ प्रभावी मूलमंत्र
काही अपवाद वगळता प्रत्येक जण आशावादीच असतो. मात्र, आयुष्यात अनेकदा नकारात्मकता मनाचा ताबा घेते. आयुष्याच्या संघर्षात अशा वेळा येणे अगदी स्वाभाविक असते. अशावेळी आपण काहीही न करता शांत बसणे पसंत करतो. अशावेळी तेच योग्य आहे. अशावेळी शांत राहून स्वतःला विश्राम देणे आणि तात्पुरत्या नैराश्यातून सावरण्यासाठी वेळ देणे आवश्यकच असते.