बॅंगलोर डायरीज… श्री श्रींच्या सान्निध्यात (भाग- २ )
मग मुद्रा प्राणायाम शिकवला जातो, आणि त्यानंतर गुरुजींचे आगमन होते, गुरुजींच्या येण्याने वातावरणात चैतन्य येते, गुरुजी म्हणतात, चला, आज वेगळे असे ‘वर्णमाला ध्यान’ करूया. ध्यान झाल्यावर, गुरुजी म्हणतात, लहानपणी आपण सर्वात पहिले ‘अ आ इ ई’ , ही बाराखडीच शिकलो, तेव्हा आपण खूप निरागस होतो, ही बाराखडी ऐकताच आपले निरागस भाव पुन्हा जागृत होतात.