कांस्य पदक मिळवणारे रौप्य पदक मिळवणाऱ्यांपेक्षा जास्त आनंदी होतात का? जाणून घ्या काय आहे सत्य

सध्या ऑलिंपिक स्पर्धा सुरु असल्यामुळे आणि त्यातही मीराबाई चानू आणि पी.व्ही. सिंधु ह्यांनी भारतासाठी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदके मिळवल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

त्यानिमित्ताने मानवी स्वभावाचा हा एक पैलू समोर आला आहे.

जिंकणाऱ्या खेळाडूंपैकी कांस्य पदक मिळवणारे खेळाडू हे रौप्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त आनंदी होतात असे मानसशास्त्र तज्ञ असणाऱ्या लोकांना आढळून आले आहे. हे केवळ एखाद्या घटनेमुळे काढलेले अनुमान नाही, तर मानसशास्त्र तज्ञांनी अनेक खेळाडूंच्या मानसिकतेचा अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत.

खरे तर रौप्य पदकाचा दर्जा कांस्य पदकापेक्षा वरचा असतो. तरीही असे का होते?

ह्याचे कारण असे की जेव्हा उपांत्य सामने खेळवले जातात तेव्हा त्या दोन्ही सामन्यात जिंकणारे खेळाडू अंतिम सामना खेळतात. अंतिम सामना जिंकणाऱ्या खेळाडूला सुवर्ण पदक मिळते. तर अंतिम सामना हरणाऱ्या खेळाडूला रौप्य पदक मिळते.

कांस्य पदकासाठीचा सामना मात्र उपांत्य फेरीत हरणाऱ्या दोन खेळाडूंमध्ये होतो आणि त्या सामन्यात जिंकणाऱ्या खेळाडूला कांस्य पदक मिळते.

इथेच मेख आहे. सामना ‘जिंकून’ जे पदक मिळते ते जास्त मोलाचे वाटते हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे. खरे तर रौप्य पदक मिळवणारा खेळाडू त्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूच्या वरचढ ठरलेला असतो. परंतु अंतिम सामना हरल्यामुळे मानवी स्वभावानुसार त्या खेळाडूला निराशा वाटू शकते. त्याउलट एक सामना जिंकून कांस्य का होईना पदक तर मिळवले असे वाटून तिसऱ्या स्थानावर आलेला खेळाडू मात्र आनंदी होतो.

तसे पाहता कोणतेही पदक मिळवणे ही अभिमानाचीच बाब आहे. सर्वच खेळाडू त्यासाठी अतिशय मेहनत घेतात. काही त्यात विजयी होतात आणि काही हरतात. पण प्रयत्न सर्वांनीच केलेले असतात.

परंतु पदक मिळवतानाच्या भावनांमुळे मानवी स्वभावाचा एक पैलू समोर येतो. रौप्य पदक जिंकणाऱ्यास वाटते की ‘ अरेरे, मी हरलो, मला सुवर्ण पदक मिळाले असते.’ आणि कांस्य पदक मिळवणाऱ्यास वाटते की ‘ वाह, मी जिंकलो! मला पदक तरी मिळाले.’

अशा वाटण्यास मनोवैज्ञानिक भाषेत काऊंटरफॅक्च्युअल थिंकिंग (counterfactual thinking) असे म्हणतात.

तर अशी ही रौप्य आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची कहाणी. ह्याबाबत तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय