मावळच्या दर्याखोर्यात भटकण्याचा अनुभव! (किल्ले लोहगड आणि विसापूर भटकंती)
असंच समोरच्या अजस्त्र डोंगराकडे एकटक पाहत होतो, निरनिराळे विचार मनात येत होते, हा सह्याद्री किती घटनांचा साक्षीदार असेल ना? जवळ जवळ नऊशे वर्ष जुन्या लेण्या इथे कोरल्या आहेत, त्याच्या आधीच्या, नंतरच्या किती माणसांना ह्याने बघितले असेल? सांभाळले असेल?