संघर्ष जेवढा मोठा, विश्वास ठेवा यश तेवढंच मोठं असेल
आपल्या आयुष्यातल सगळे दिवस सारखे नसतात. प्रत्येकाचा एक वाईट काळ असतो. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे दिवस आले असतील जेव्हा आपल्याला वाटते की बास! आपण जगू शकत नाही. आपण करू त्या कामात अपयश मिळत असते, नवीन जबाबदारी स्वीकारली की त्यात अनेक अडथळे येत असतात.